ट्रंप यांची बदललेली भूमिका: भारतावर टॅरिफ लावल्यानंतरही मैत्रीची भाषा, पंतप्रधान मोदींचाही सकारात्मक प्रतिसाद.

5

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी भारतावर ५०% टॅरिफ लावल्यानंतर पंतप्रधान मोदींसोबत मैत्रीची भाषा केली. मोदींनीही सकारात्मक प्रतिसाद देत भारत-अमेरिका रणनीतिक भागीदारीवर भर दिला.

अमेरिकेला आता हे लक्षात आले आहे की भारताशी नातेसंबंध बिघडवून त्याने योग्य केलेले नाही. याची झलक आता दिसू लागली आहे. भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर स्वतःच्या देशात चौफेर टीकेचे धनी ठरलेल्या राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचीही भाषा बदलू लागली आहे.

सोमवारी व्हाईट हाऊस मध्ये ट्रंप म्हणाले, “मी नेहमी मोदींचा मित्र राहीन, ते एक महान पंतप्रधान आहेत.” त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील “विशेष नाते” असल्याचेही नमूद केले. हे वक्तव्य व्यापार, टॅरिफ आणि रशियाकडून तेल खरेदी यासंबंधी सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले…

पंतप्रधान मोदी यांचे उत्तर – 
मोदींनी एक्सवर पोस्ट करत ट्रंप यांच्या विधानाचे कौतुक केले. त्यांनी लिहिले, “राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या भावना आणि आपल्या संबंधांबाबत केलेल्या सकारात्मक मूल्यांकनाची मी मनापासून प्रशंसा करतो. भारत आणि अमेरिका हे सकारात्मक व भविष्याभिमुख रणनीतिक भागीदारीचे…”

यापूर्वी भारतावर टॅरिफ लावले होते
रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात अपयशी ठरलेले ट्रंप यांनी नाराजीपोटी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावले होते. यासोबतच त्यांनी असा युक्तिवाद केला की, भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.

ट्रंप यांना वाटले की भारत दबावाखाली येईल, परंतु पंतप्रधान मोदींनी इतर पर्यायही शोधून काढले. त्यामुळे ट्रंप चौफेर अडचणीत सापडत गेले. अखेरीस आता त्यांच्या भूमिकेत बदल दिसू लागला आहे.

सोर्स

5 Comments
  1. Sanghpal Arun Wahurwagh says

    खूप छान लिहिले नितीन सर

  2. Sanghpal Arun Wahurwagh says

    खूप छान लिहिले नितीन सर

  3. Sanghpal Arun Wahurwagh says

    खूप छान लिहिले नितीन सर

  4. Sanghpal Arun Wahurwagh says

    खूप छान लिहिले नितीन सर

  5. Sanghpal Arun Wahurwagh says

    खूप छान लिहिले नितीन सर

Leave A Reply

Your email address will not be published.