हवामान विभागाकडून अलर्ट..

0

राज्यात पुढील 3 दिवस पावसाचा धुमाकूळ.

हवामान विभागाकडून अलर्ट.

 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात बदल होत असल्याने काल अनेक ठिकाणी पावसासह गारपीटीची नोंद झालीयं. या पार्श्वभूमीवर राज्यात पुढील तीन ते चार दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.

सध्या उत्तर भारताच्या अनेक भागात पाऊस कोसळत असून या भागांना पावसाचा इशारा देण्यात आलायं. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरुन येणारे वारे तसेच पश्चिमी विक्षोभ या काही नैसर्गिक कारणांमुळे राज्यात मंगळवारपासून पुढील दोन ते तीन दिवस, विशेषत: राज्याच्या अंतर्गत भागात पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.