महाराष्ट्र दिन.

0

महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. त्या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी १ मे हा दिवस “महाराष्ट्र दिन” म्हणून साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण राज्यात सार्वजनिक सुट्टी असते आणि विविध सांस्कृतिक तसेच शासकीय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मुंबईतील शिवाजी पार्क येथे भव्य परेड आयोजित केली जाते, ज्यात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात.

१९५६ च्या राज्य पुनर्रचना कायद्याअंतर्गत भाषेच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. त्यावेळी तयार झालेल्या मुंबई राज्यात मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी भाषिक प्रदेशांचा समावेश होता. यामुळे स्वतंत्र मराठी राज्याच्या मागणीसाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली.

राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिल्यामुळे जनतेत मोठा संताप पसरला. या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलन आणि निषेध सभा घेण्यात आल्या. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबईतील फ्लोरा फाउंटन येथे मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, परंतु आंदोलन शांत झाले नाही. शेवटी मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले, ज्यात १०६ आंदोलक हुतात्म झाले.

या बलिदानानंतर सरकारला झुकावे लागले आणि २५ एप्रिल १९६० रोजी भारतीय संसदेत बॉम्बे पुनर्रचना कायदा मंजूर करण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्ये निर्माण करण्यात आली. हा कायदा १ मे १९६० पासून लागू झाला.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या १०६ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ १९६५ साली स्मारक उभारण्यात आले. महाराष्ट्र दिनी त्यांना अभिवादन केले जाते. १ मे २०११ रोजी महाराष्ट्राने आपल्या स्थापनेचा सुवर्णमहोत्सवही साजरा केला.

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि शासकीय उपक्रम आयोजित केले जातात. शाळा, सरकारी कार्यालये आणि अनेक खाजगी संस्था या दिवशी बंद असतात. हा दिवस महाराष्ट्राच्या एकतेचा, संस्कृतीचा आणि अभिमानाचा प्रतीक म्हणून साजरा केला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.