कुठे गेले ते आंदोलनकर्ते, जे घोषणा देत होते की “ चार लाख ट्रॅक्टर घेऊन दिल्लीला घेरू ” ?

कुठे गेले ते आंदोलनकर्ते, जे घोषणा देत होते की “ चार लाख ट्रॅक्टर घेऊन दिल्लीला घेरू ” ?

आज पंजाबमध्ये पुरामुळे हजारो शेतकरी बांधव उद्ध्वस्त झाले आहेत. घरं पाण्यात वाहून गेली, जनावरं दगावली, शेतजमिनी पूर्णपणे नष्ट झाल्या. खरी वेळ आली असताना हेच तथाकथित शेतकरीप्रेमी आंदोलनकर्ते चार ट्रॅक्टर घेऊनसुद्धा मदतीला गेले का? नाही!

कारण अगदी स्पष्ट आहे. दिल्ली घेरण्यासाठी त्यांना फंडिंग होतं. मागे “डीप स्टेट” उभं होतं. पण शेतकऱ्यांच्या खऱ्या अडचणी सोडवायला त्यांना ना पैसा मिळतो, ना राजकीय फायदा होतो. म्हणूनच ते आज बेपत्ता आहेत. हे आंदोलन कधीच शेतकऱ्यांसाठी नव्हतं. तो फक्त एक बहाणा होता. खरी खेळी होती नरेंद्र मोदींना हटवण्याची. भारताची संपत्ती लुटण्यासाठी, भारताला पुन्हा गुलाम बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय टोळ्या आसुसलेल्या आहेत. पण त्यांच्या आड उभे आहेत फक्त नरेंद्र मोदी. मोदींना हटवण्याचा कुणाकडे काही प्लॅन असेल तर सांगा. मग ४ लाख काय, ४० लाख ट्रॅक्टरांच्या किंमतीएवढं फंडिंग अमेरिका आणि त्यांचे दलाल करतील. पण त्यांनी हे विसरू नये – मोदींच्या मागे ८० कोटी हिंदू खंबीरपणे उभे आहेत.

अमेरिकन दलालांनो, लक्षात ठेवा –
मोदींचं एक केस वाकडं करण्याची ताकद तुमच्या बापाच्या बापातही नाही. देश संकटात असताना मोदी सरकार मैदानात उतरून मदतकार्य करतं.
पण हे आंदोलनकर्ते मात्र त्या वेळी बिळात लपून बसतात. देशभक्ती म्हणजे दिल्लीत गोंधळ घालणं नाही. खरी देशभक्ती म्हणजे.

– पुरग्रस्तांना मदतीचा हात देणं,

– शेतकऱ्यांच्या आयुष्याची काळजी घेणं,

– आपत्तीच्या वेळी खांद्याला खांदा लावून उभं राहणं.

ज्यांनी स्वतःला शेतकऱ्यांचे तारणहार म्हणून मिरवलं होतं, ते खऱ्या वेळी बेपत्ता झाले आहेत. यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते – ते कधी शेतकऱ्यांचे नव्हतेच, ते फक्त परदेशी दलालांचे प्यादे होते. 

आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी डोळसपणे विचार करावा –
खरोखर शेतकऱ्यांचे रक्षण करणारे कोण? आणि देशाला विकायला तयार असलेले दलाल कोण? काँग्रेस नेतृत्वाखालील यूपीए सरकारचे गृह राज्यमंत्री मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी २०१३ मध्ये लोकसभेत सांगितले होते की, “नैसर्गिक आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची कोणतीही तरतूद नाही.” पण सुदैवाने आता पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार आहे, ज्यांनी सध्याच्या हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील नैसर्गिक आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती घोषित केले आहे.

जय हिंद !
– जयसिंग मोहन 🚩

कोंग्रेस.पंजाबमोदीशेतकरी आंदोलन
Comments (0)
Add Comment