महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी नवरात्रीतील गरबा कार्यक्रमांमध्ये ओळखपत्र तपासणी करण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) सल्ल्याला पाठिंबा दिला आहे.
भाजप आमदार आणि महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी २२ सप्टेंबर रोजी, गरबा आयोजकांनी सहभागी होणाऱ्या लोकांची कठोर ओळखपत्र तपासणी करावी, या विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) सल्ल्याला पाठिंबा दिला.यात चुकीचं काय आहे? माझ्या माहितीनुसार, इस्लाममध्ये मूर्तीपूजा केली जात नाही. ‘लव्ह जिहाद’ वगळता, मुस्लिमांनी गरब्यात सहभागी होण्यामागे मला दुसरे कोणतेही कारण दिसत नाही,” असे राणे मुंते पुढे म्हणाले, “ते खोट्या ओळखीने अशा कार्यक्रमांमध्ये येतात आणि आमच्या महिलांचा छळ करतात. लव्ह जिहादची प्रकरणे तिथूनच सुरू होतात.”बईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. गरबा कार्यक्रमांना ‘लव्ह जिहाद’चे केंद्रस्थान म्हणत राणे यांनी आपली टिप्पणी आणखी तीव्र केली. त्यांनी आरोप केला की, नवरात्रीच्या उत्सवातील मुस्लिम सहभागामागील हेतू हिंदू महिलांना आकर्षित करणे आणि त्यांना फसवण्याचे प्रकार वाढत आहेत.
“विश्व हिंदू परिषदेची (VHP) मागणी रास्त आहे. जर तरीही कोणी गरब्यात येत असेल तर त्याचे धर्मांतर करा, कारण तो (अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन) हिंदू बनण्यास तयार आहे,” असे राणे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, हिंदू संघटनांना ‘धर्मांतर प्रक्रिये’साठी तयारी करण्यास सांगितले जाईल. “शेवटी, पूर्वी कधीकाळी आपण सर्वजण हिंदूच होतो,” असे ते म्हणाले. गरबा हा नवरात्री उत्सवाचा एक अविभाज्य भाग आहे. यंदा, नऊ दिवसांच्या या उत्सवाला २२ सप्टेंबर रोजी सुरुवात झाली. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमधील आयोजकांना मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग दिसतो.
विश्व हिंदू परिषदेने (VHP) अलीकडच्या काही वर्षांत या कार्यक्रमांमध्ये धार्मिक ओळख लपवून आलेल्या पुरुषांकडून महिलांना लक्ष्य करण्याच्या कथित घुसखोरीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. राणे यांच्या या वक्तव्यामुळे या मागणीला राजकीय बळ मिळाले आहे.
सणांमधील गर्दीच्या कार्यक्रमांवर अधिक बारकाईने लक्ष ठेवले जात असताना आणि त्यांचा वापर अंमली पदार्थांचे सिंडिकेट्स तसेच हिंसक टोळ्यांकडून होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राणे यांचे हे वक्तव्य आले आहे. याच कारणांमुळे, विविध राज्यांमधील पोलीस दलांनी अधिक दक्षता बाळगण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत.