संघाचे समरसतेतुन राष्ट्रनिर्माणाकडे जाण्याचे स्वप्न.
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्षाचा झाला. संघाचा इतिहास जवळ जवळ आज सर्वांना काही प्रमाणात का असोना मात्र माहितीये.पण त्या इतिहासातून आज संघ वर्तमानात कुठल्या दिशेने चालला आहे हे लिहायला मला जास्त आवडेल.
आज जर संघ सांगायचा झाला तर मी म्हणेन की शंभर वर्षात संघाने जर काही कमावले असेल तर तो प्रत्येक समाजातील व्यक्ती आणि आपुलकीचा, जिव्हाळ्याचा समरस भाव कमावला.
संघाचा मूळ पाया शाखा आहेत, शाखेतून व्यक्तीनिर्माण, आणि व्यक्तीनिर्मार्णातून राष्ट्रनिर्माण. जर आपल्याला आपले राष्ट्र जगाच्या पाठीवर एक आदर्श, प्रेरणादायी शक्तिशाली बनवायचे असेल तर राष्ट्रात सर्वात प्रथम समरसता असणे अत्यंत महत्वाचे आहे.
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेचं एकमेव असं संघटन आहे ज्या ठिकाणी जात कधीही विचारल्या नाही जात. जो जाती मे फसा वो किचड मे फसा.कारण जर भारताला सर्वांना सोबत घेऊन पुढे न्यायचे असेल आणि हिंदुसंस्कृती अबाधित ठेवायची असेल जर जातीच्या फेऱ्यातून बाहेर पडणे खूप गरजेचे आहे.समाजातून स्पृश्य अस्पृश्य हा भेद दूर होणे खूप महत्वाचे आहे.आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज सर्व समाजातील घटक वर्गाला सोबत घेऊन पुढे जातोय.आपण सर्व जण हिंदू आहोत आपल्यात कोणीच उच्च आणि नीच नाही, हा भाव प्रत्येक व्यक्तीच्या मनात रुजवण्याचे काम आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतोय.
मला येथे काही माझे थोडक्यात अनुभव सांगावेसे वाटतात, मी सर्वात प्रथम इयत्ता सातवी मध्ये असतांना संघाच्या शाखेत जायला सुरुवात केली. आणि मला शाखेतील खेळ संपल्यावर एक घोषणा खूप मनाला भाऊन जायची…खेळ संपल्यावर खेळ घेणारे मास्तर म्हणायचे कोन जिता भाई कोन जिता? आणि त्यामागे सर्व स्वयंसेवक म्हणायचे संघ जिता भाई संघ जिता… म्हणजेचं आपण शाखेत सुद्धा खेळत असतांना कोणीही जिंकलं नाहीये, आणि कोणीही हारलं देखील नाहीये तर आपण सगळे जिंकलो आहोत, म्हणजेचं आपण समूहात आहोत म्हणून संघ जिता भाई संघ जिता. या एका घोषणेमागील भाव जर मन लावून समजून घेतला तर त्याचा अर्थ समरसता या गोष्टीला घेऊन खूप मोठा होऊ शकतो, तो म्हणजे आम्ही सर्व समान आहोत. जिंकलो तरीही संघ जिंकेल. आणि शाखेत कधीही कोणाला जात विचारल्या जात नाही.म्हणून आज संघातून समरसतेकडे आपण भारत घेऊन जात आहोत. संघात आले की माणूस हा समरस होतोचं त्याच्या मनात कधीही कोणाच्या जातीबद्दल चा द्वेष दिसून येत नाही.
मी एक दोनदा विभाग प्रचारकांसोबत खेडेगावात प्रवासाला सुद्धा गेलोय, आणि गावात स्वयंसेवकांच्या घरी मुक्कामी पण राहिलोय. मी मुद्दाम प्रचारकांचे नांव येथे घेत नाहीये कारण त्यांना त्यांच्या नावाची प्रसिद्धी आवडणार नाही.पण प्रचारकांसोबत केलेला एखाद्या गावात मुक्कामी प्रवास हा खूप काही आयुष्यात शिकवून जातो.. गावात गेल्या बरोबर तिथले स्वयंसेवक विभाग प्रचारक येणार म्हणून उपस्थित असतात, सगळे राष्ट्रभावनेने प्रेरित झालेले असतात. आणि अश्याच स्वयंसेवकांकडे मुक्कामी राहण्यात एक वेगळाच आनंद असतो, संघात कोणीही कोणाकडे एकमेकांची जात बघून मुक्कामी राहत नाही. संघ स्वयंसेवक प्रत्येकाकडे पाणी चहा कॉफ़ी पितो आणि एकमेकाकडे बंधुत्वाच्या नजरेने बघतो ही आहे संघातून समरसतेकडे जाण्याची पहिली पायरी. म्हणून आज समाज संघात येऊन समरस होऊन राष्ट्रकार्यात लागलाय.
राष्ट्रनिर्माणाच्या या यज्ञात आम्ही सर्व एक आहोत हा भाव घेऊन स्वयंसेवक काम करतो. आज अनेक सेवा वस्तीत संघाचे सेवा प्रकल्प चालतात त्याठिकाणी आपलेच बंधू जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत, जे काही कारणास्तव मघास राहिले अश्यांची सेवा करणे सुद्धा आमचे काम आहे, हा भाव मनात ठेऊन संघ जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करतोय.
सेवावस्तीत संघ दवाखाणे, शाळा, व्यसनमुक्ती केंद्र चालवतो. म्हणून आज खऱ्या अर्थाने संघातून समरसता नांदते आहे. मी तर म्हणेन आज प्रत्येकाने संघात येऊन या समरसतेच्या यज्ञात आहुती टाकावी आणि आपल्या देशाच्या राष्ट्रनिर्माणात आपला खारी इतका तरी वाटा असावा याची प्रेरणा मनी जागवावी.
संघ म्हणजे व्यक्तीनिर्माण, संघ म्हणजे समरसता,संघम्हणजे राष्ट्रनिर्माण आणि आपण सर्व जण संघात येऊन समरस भारताचे मॉडेल काही दिवसात जगापुढे नक्की ठेऊ याची पूर्ण खात्री आहे.
संघ शंभर वर्षाचा झाला आणि शंभर समाजाला एकत्र घेऊन एकमेकांप्रति प्रेमाची भावना रुजवीत गेला.पथ का अंतिम ध्येय नही है सिंहासन चढते जाना, सब समाज को साथ लिये आगे है बढते जाना…
भारत माता की जय
RSS@100
अभिषेक म पत्की.