जनमन.. आरक्षण महाराष्ट्राची दशा आणि दिशा.

1

जनमन.. आरक्षण महाराष्ट्राची दशा आणि दिशा.

सद्यास्थित महाराष्ट्रातील आरक्षणाची चळवळ बघता असे दिसून येते कि,हाच काय तो महाराष्ट्र ज्यांनी पूर्ण देशाला पुरोगामी वाटचाल दिली.देश घडवणीत महाराष्ट्राचे योगदान असो वा संविधानात महत्वाची जबाबदारी असो.ती येथील मजबूत खांद्यानी पार पाडली.

         महाराष्ट्र म्हटले कि संतांची उज्ज्वल परंपरा ते राजकीय क्षमता पूर्ण देशांनी बघितली. बाबासाहेबांनी केलेली आरक्षणाची तरतूद आणि  आरक्षण दिलेल्या वर्गाचा दर्जा योग्य स्तरावर आल्यानंतर  आरक्षण काढून टाकण्याची व्यवस्था असताना सुद्धा ती दूर करण्यास आपली राजकीय इच्छाशक्ती कमी पडताना दिसते. याउलट आपणास  दिलेली आरक्षण मर्यादा ओलांडत आहोत.

पुरोगामी महाराष्ट्र म्हणता म्हणता आपण आरक्षणात एवढे खोलवर रुतलो कि त्यामधून बाहेर निघणे अवघड होऊन बसले आहे.आजच्या घडीला आरक्षण कसे द्यावे ,कुणाला द्यावे,कुणाला आवश्यकता आहे,याची व्यवस्था दिसून येत नाही.,

श्री यशवंतराव- साहेब यांच्या पासून  ते आजच्या घडीला देवेंद्रजी यांच्या सारखे दूरदृष्टी असलेले नेते महाराष्ट्रस लाभले .या अडचणीत योग्य मार्ग मोठे राजकीय पक्ष ,पक्षहित बाजूला सारून योग्य मार्ग नाही काढणार तर कोण काढणार ….

फक्त शक्ती प्रदर्शन दाखवून संपूर्ण व्यवस्थेला कोंडीत पकडून आरक्षण पदरात पाडत असतील, तर चुकीचा संदेश जाण्याचे काम होईल.उद्या इतर वर्ग हाच मार्ग अवलंबतील. यामध्ये आर्थिक विषमता दूर करणारे मार्ग सरकार ला तयार करावे लागतील.

सत्ता केंद्रस्थानी माणून जर राजकीय पक्ष आरक्षण देत असतील ,तर उद्या या महाराष्ट्राची  नेपाळ , बांग्लादेश सारखी परिस्थिती होणार नाही ना . अशी अनाहुक भीती मनात घर करून  जाते.

यावर देवेन्द्राजी योग्य मार्ग काढतील हीच अपेक्षा…..

                                                                    

अॅड.हरिष एस .झापर्डे.अकोट.

image google

1 Comment
  1. Sudarshan Belokar says

    अतिशय योग्य व सुंदर विवेचन. भविष्यामधील होऊ पाहणाऱ्या घटनांचा उत्तम वेध घेतला आहे. राज्यकर्त्यांनी याचा विचार करायला हवा.

Leave A Reply

Your email address will not be published.