दार उघड बये दार उघड …!

0

दार उघड बये दार उघड …!

लँड जि!हाद, लव जि!हाद, जिम जि!हाद,कॉर्पोरेट जि!हाद…ही यादी वाढतच आहे. या घटना आणि त्यांचे परिणाम,तरुणींचं शोषण सातत्याने समोर येत आहे. समाज माध्यमांवरचे videos,बातम्या, सखोल लेखन, चित्रपट, विविध सामाजिक संस्थांद्वारे जनजागृती…एवढंच काय पण पोलिसांकडून मिळणारी माहिती आणि सतर्कतेचा इशारा….चोहीकडून या विषयावर लख्ख प्रकाश टाकला जात आहे. एकूणच त्यांची सतत बदलणारी modus operandi (कामाची पद्धत) आपल्याला वारंवार सावध करत आहे. पण तरीही समाजातल्या तरुणी मनाची कवाडं का बंद करून बसल्या आहेत? ज्या निरपराध आहेत, त्यांचा इथे विषय नाही. परंतु ज्या हे सारं टाळू शकतात त्यांना मात्र परखड प्रश्न विचारणं तितकंच महत्त्वाचं आहे.

औद्योगिक संस्था, दुष्कृत्य करण्यासाठी रूम पुरवणारी हॉटेल्स…अशा सगळ्यांना तेवढंच जवाबदार (accountable) ठरवणं, धर्मांतरविरोधी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी, जनजागृती,पोलीस कारवाई याद्वारे उपाय सुरू आहेतच. पण – माझा सवाल आहे तो स्वतः victim mode मध्ये वावरणाऱ्या तरुणी आणि स्त्रियांबद्दल.

….कशासाठी?

बाई गं, अशी कोणती अगतिकता आहे की जी बुद्धीला झापडं लाऊन चुकीच्या माणसांवर अंधविश्वास ठेवायला भाग पाडत आहे? वैयक्तिक आयुष्यात अशी कोणती जगावेगळी दु:खं आहेत ज्यामुळे सतत तुम्ही victim होऊन आधारासाठी खांदा शोधत आहात? अशी कोणती हतबलता आहे की ज्यामुळे आत्मसन्मान विकून तुम्हाला नोकरी आणि प्रमोशन हवं आहे? कुटुंबव्यवस्था,संस्कार,चांगली संगत हे सारं क्षणांत डावलून ‘मुक्त’ होण्यामध्ये तरुणींना कसली धन्यता वाटत आहे? रोज नवनवीन डावपेचांना, निरनिराळ्या पद्धतीने केलेल्या बुद्धीभेदांना बळी पडतांना तुमचं शिक्षण, तुमचा विवेक, स्वाभिमान कुठे गहाण ठेवताय? पदोपदी लावलेले सापळे आपण ओळखायला पाहिजेत,त्यापासून चातुर्याने दूर रहायला पाहिजे असं अजूनही वाटत नाही का? हे परखड प्रश्न सर्वांना लवकरात लवकर जागं करोत.

ज्याप्रमाणे ‘गरीब परिस्थिती, शिक्षणाचा अभाव वगैरे गोष्टी समाजात दहशतवादी तयार करतात,मुळात ती निरागस माणसंच असतात’ हा मूर्ख समज आता दूर झालाय आणि त्याच्या मुळाशी असणारी टोकाची धर्मांध वृत्ती कुणीही नाकारू शकत नाही, त्याचप्रमाणे ओळख लपवून करण्यात येणारी कारस्थानं,मुलींचं शोषण,धर्मांतर,पाठोपाठ क्रूर हिंसा असा घटनाक्रम लवजि!हादचा हेतू स्पष्ट करतो आणि या घटनांना व्यक्तीस्वातंत्र्य किंवा आंतरधर्मीय विवाह इ. कायदेशीर गोष्टींपासून वेगळा करतो (अजूनही काही ढोंगी लोक या घटनांना सामान्य म्हणून गृहीत धरत आहेत ही गोष्ट वेगळी). कोणते मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहेत?

सशक्त प्रतिमा

काही ना काही वैयक्तिक अडचणींमध्ये ग्रासलेल्या तरुणी शोषणाला लवकर बळी पडत आहेत. असं का? संस्कृतात एक सुंदर सुभाषित आहे. ज्या लाकडामध्ये आग/ ठिणग्या स्पष्ट दिसतात ते ओलांडण्यासाठी सहसा कुणी धजावत नाही, पण जिथे ती प्रकर्षाने दिसत नाही, आतल्या भागात असते, ते लाकूड कुणीही सहज ओलांडण्याचं धाडस दाखवतं. तशीच व्यक्तीची प्रतिमा(image) आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक मुलीची प्रतिमा करारी का असू नये? प्रयत्नपूर्वक तिने ती तशी घडवावी. स्वतःचं आत्मबळ वाढवावं. महाविद्यालय असो, ऑफिस असो,व्यवसाय असो – समर्थ,सशक्त व्यक्तिमत्त्व आपोआपच संकटांना दूर ठेवतं. याउलट स्वतःच्या अपयशासाठी कायम परिस्थितीला दोष देणं, कुटुंबातले वाद बाहेर सांगणं, स्वतःला दुर्बल, हतबल समजून प्रत्येक वळणावर परिस्थितीचं उदात्तीकरण करणं थांबवायला हवं.त्यातूनच शोषणासाठी मुली हेरल्या जातात. समोरचा तुमच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन स्वतःचा खांदा पुढे करतो. तुम्ही त्याचं स्वागतच करता!

माझी सुरक्षा – माझी जवाबदारी

‘my life – my space’ म्हणता तसंच स्वत:च्या सुरक्षेची किती जवाबदारी घेता? सामाजिक स्तरावर हा विषय महत्त्वाचा आहेच परंतु एकूणच स्वतःच्या सुरक्षेसाठी जाणतेपणाने आम्ही काय काय करतो? किती सतर्क आहोत? खूप उदाहरणं आहेत. तपासून बघा – पालक म्हणून शाळा, ट्यूशन किंवा इतर आवश्यक whats app groups व्यतिरिक्त आपण किती whats app groups चा भाग आहोत? ब्युटिपार्लर, रेसिपीज, साड्या आणि दागिने खरेदी, गृह सजावट, tattoos, छंद,सौंदर्य प्रसाधनं, इतर business groups,प्रॉपर्टी खरेदी विक्री,ट्रेडिंग अशा वेगवेगळ्या कारणांमुळे एकेक स्त्री कित्तीतरी whats groups मध्ये सध्या सहज active असते ही वस्तुस्थिती आहे! त्या ग्रुपमधल्या बाकी सदस्यांना तुम्ही ओळखता का? त्यातून तुमच्याविषयी महत्त्वाची माहिती, तुमच्या नकळत किती लोकांपर्यंत सहज पोहोचते याची कल्पना तुम्हाला आहे का?

कुणाकडून काही प्रॉडक्ट/सेवा घेतली की तो म्हणतो मी तुम्हाला whats app ग्रुप मध्ये अॅड करतो म्हणजे पुढचे प्रोडक्टस आले की तुम्हाला ग्रुपवर दिसतील…कशासाठी? notifications साठी सुद्धा number देऊ नका. काम झालं की तो नंबर आपण कितीदा ब्लॉक करतो?

आवश्यक तेवढंच बोला

परवा एका किराणा दुकानात home delivery साठी दुकानदाराला आलेला फोन स्पीकरवर टाकून तो विचारतो, “दाल २ किलो कर दू? त्यावर बाई म्हणतात, “नही, इतने बडे घर में हम दोनो ही रहते है…उसमें भी हसबंड ज्यादातर बाहरगाव जाते है..ज्यादा समान का क्या करू? आप एक किलो लिखिए|” मी समोरच होते. एक किलो की दोन एवढंच बोला. इतर भाषण कशाला करता! Home deliveries मुळे सुलभता वाटते, पण धोकाही तेवढाच वाढत आहे, लक्षात घ्या.

रक्षक की भक्षक? कसं ओळखायचं?

Delivery boys व्यवस्थित entry करून येत आहेत का? येणारे नक्की त्याच फ्लॅटच्या पत्त्यावर जात आहेत का? काम झालं की लगेच बाहेर पडत आहेत की तिथेच घुटमळत इतर माहिती काढत आहेत? ज्या security एजन्सीकडे सोसायटीच्या सुरक्षेची जवाबदारी/कॉंट्रॅक्ट आहे…ती एजन्सी सहसा कसे गार्ड्स पुरवत आहे? हेही बघायला हवं. काहीही संशयास्पद आढळल्यास त्यांच्याकडून तत्काळ काम काढून घ्यावं. दुरुस्तीसाठी सुतार,प्लंबर,इलेक्ट्रिशियन,गाडीसाठी ड्रायवर इत्यादि पुरवणाऱ्या एजन्सीने कोणाला पाठवलं आहे? संशयास्पद आढळल्यास घरात घेऊ नये/त्याच्या गाडीत जाऊ नये. काम करतांना अरेरावी केली तर रिमार्क नोंदवण्यासाठी विसरू नये.

कम्फर्ट झोन

मी सॉफ्टवेअर इंजीनियर आहे, मी मॅनेजमेंट क्षेत्रात काम करते… माझा इतर सामाजिक समस्यांशी काय संबंध?everything is politics yaar…मला दूर रहायचं आहे.. असं म्हणत अनेक सुशिक्षित स्त्रिया मतदानही करण्याची तसदी घेत नाहीत. अशा भिंती घालून घेणाऱ्या स्त्रिया सर्रास आढळतात भोवती. नोकरी,weekend life, शॉपिंग इ. चकोरीचा कम्फर्ट झोन कधी होतो त्यांचं त्यांनाही कळत नाही! ज्या राष्ट्राचे तुम्ही नागरिक आहात, ज्या समाजात तुम्ही रहाता, त्याविषयी एवढी उदासीनता कशासाठी? ‘work-life balance’ वर सातत्याने चर्चा होताना दिसते, पण त्यातल्या ‘life’ चा परीघ किती मोठा आहे, ते नको समजून घ्यायला? समाजकारण, धर्मकारण,अर्थकारण,राजकारण सगळं मला कळणं अतिशय गरजेचं आहे, ही जाणीव केव्हा होणार? त्यासाठी मनाची कवाडं कधी उघडणार बये!

विघटन की संघटन

मागच्या महिन्यात बीडमध्ये भयंकर घटना घडली. चुकून गाडीचा जरासा धक्का लागला म्हणून एका निवृत्त सैनिकावर जीवघेणा हल्ला झाला. काही मिनिटांत रही!म शे!ख नावाच्या गुंडाने मोठी गँग जमा करून त्या सैनिकाला बेदम मारहाण केलीच वर त्याच्या संपूर्ण अंगावर उकळता चहा टाकला. अजूनही वेदनांनी ओरडणारा त्यांचा आवाज ऐकवत नाही. ज्या सैनिकाच्या जिवावर इथे सुरक्षित राहून ऐशोआरामात जगताय त्याच्याच जिवावार उठताय? असा कोणताही जमाव धाऊन आला तर विघटनवाद पसरवणाऱ्या जातीजातींच्या झुंडी वाचवणार आहेत का? की संपूर्ण समाज एकत्र येऊन या आक्रमणाला थोपवणार आहोत हा विचार गांभीर्याने करावा.

सुसंवादाचा पूल

पालक -पाल्य हा संवाद उत्तम हवाच. त्यातही आईची भूमिका महत्त्वाची आहे. एक गोष्ट पालकांशी बोलतांना जाणवते – ‘धर्म, धर्माधर्मांतले वाद, हे सगळं कशाला सांगायचं ना मुलांना? आणखी लहान आहेत ते!पुढे तर भारतात रहातील की नाही हेही माहित नाही!’ लहान मुला मुलींबरोबर घडणारे इतके भयंकर गुन्हे,त्यांचं शोषण होत असूनही आपण आपल्या मुलांना मात्र गुलाबी फुग्यात वाढवणं ही केवढी मोठी चूक आहे! आणि या साऱ्या भोवती घडणाऱ्या गोष्टी भारतापुरत्याच मर्यादित आहेत का?

इथे असणाऱ्या धर्मांची मुख्य शिकवण, त्यांचा उगाम, आत्तापर्यंतचा इतिहास, त्या धर्माची मूल्यं, तुलनात्मक गोष्टी,आताची आव्हानं.. हे सारं मोकळेपणाने मुलांना शिकवायला नको? एखादी गोष्ट ही वरवर वाटणारा गुन्हा आहे की एखाद्या धर्माची मूळ शिकवण आणि त्याचा अविभाज्य भाग – हे स्पष्टपणे त्यांना कळायला नको? की दहशतवाद्यांशी लढण्यासाठी सैनिकांनीच मरण झेलायचं? नक्षलवाद मोडून काढताना पोलिसांनीच जीव धोक्यात घालायचा? नागरिक,पालक म्हणून माझी जवाबदारी काय? विचार करा. घराबाहेर पडल्यावर मुलं कुठल्याही प्रकारच्या बुद्धिभेदाला बळी पडणार नाहीत एवढा आपल्या संवादाचा पूल पक्का आहे का? स्वतःला विचारा.

लढाई टाळणं हाच ती जिंकण्याचा सर्वोत्तम उपाय

दुर्बलता झटकून द्यावी. आत्मविश्वास, धाडस, चातुर्य, मुख्य म्हणजे निर्णयक्षमता इ. कितीतरी नेतृत्त्वगुण मला वाढवले पाहिजेत असा निश्चय करूया. शारीरिक, मानसिक, भावनिक,बौद्धिक, आध्यात्मिक – जगण्याच्या या सगळ्या पातळ्यांवर मी सशक्त झालंच पाहिजे. समर्थ,विवेकी स्त्री ही काळाची गरज आहे.

“पितापुत्रभ्रातृंश्च भर्तारमेवं
सुमार्गं प्रति प्रेरयन्तीमिह”

अर्थात् वेळ आल्यावर स्वत:चा पिता, पुत्र,भाऊ,पती या सर्वांना देखील सन्मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करणारी अशी भारतीय स्त्री आहे! ती स्वतःच दिशाहीन होऊन कसं चालेल?

साहसी खेळ असो वा तंत्रज्ञान..भारतीय मुली आज प्रत्येक क्षेत्रात एकेक शिखर काबीज करत आहेत. तरुणींनो, शिक्षण घ्या, स्वप्नं बघा, आतोनात मेहनत घेऊन तुमचं ध्येय साध्य करा पण वैयक्तिक आयुष्यातही योग्य निर्णय घ्या. मोहांना बळी पडू नका. नाही तर मिळवलेलं यश, जिवाला जीव देणारं कुटुंब, स्वातंत्र्य.. सारं गमावून बसाल. त्यासाठी अविवेकाची झापडं उघडून डोक्यात विवेकाचा प्रकाश पडू द्या! आत्मभान जागं करा. या क्रूर रक्तबीज रक्षासाला संपवण्यासाठी आपल्याला समर्थ व्हायलाच हवं!

– मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)

Leave A Reply

Your email address will not be published.