पुस्तक – जलसंवाद, जल साक्षरतेकडून समृद्धिकडे .


मानवी संस्कृतींचा इतिहास पाहिला तर तो नद्यांच्या काठावर फुललेला दिसतो. सिंधू, गंगा, नाईल यांसारख्या नद्यांनी केवळ शेतीच नव्हे तर संपूर्ण सभ्यता घडवली. म्हणूनच “ पाणी म्हणजे जीवन ” असे म्हटले जाते. पाणी हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. अपुऱ्या पाण्याचे संकट, पाण्याची बचत, याविषयी प्रत्तेकाने कार्य करणे आवश्यक आहे. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नाही तर पुढील पिढ्यांची आणि संपूर्ण जीव श्रुष्टीचा अनमोल ठेवा आहे. आपण आज केलेली पाण्याची बचत आणि नियोजन उद्याचे सुरक्षित भविष्य असेल. या पुस्तकातील माहिती हि जलसंकट आणि त्यावर आपल्याला काय उपाय करता येऊ शकतात या उद्देशाने दिलेली आहेत. हे साध्य करायचे असेल तर प्रत्तेक घरात ‘जल संवाद’ होणे गरजेचा आहे. ‘जलसाक्षर’ होण्यास हे पुस्तक आपल्याला मदत करेल. पाणी टंचाईच्या विरोधात आपण सगळ्यांनी मिळून एक पाउल पुढे कसे टाकावे हे या पुस्ताकातून आपल्याला कळेल.
पुस्तक – जलसंवाद, जल साक्षरतेकडून समृद्धिकडे .
लेखक – नितीन राजवैद्य.
प्रकाशन – काव्यगंध प्रकाशन .
पुस्तका करिता संपर्क – www.bookganga.com
https://www.bookganga.com/eBooks/B/99TZO
९८८१५६०१५५ (whatsaap only)