बंगाल: मुख्य प्रवाहातील पुनरागमन आणि भविष्याची दिशा.

बंगाल: मुख्य प्रवाहातील पुनरागमन आणि भविष्याची दिशा.

आजचा निकाल केवळ राजकीय विजय नसून तो एका मोठ्या वैचारिक परिवर्तनाचा संकेत आहे. गेल्या काही दशकांपासून बंगाल ज्या ‘एककल्ली’ मार्गावर चालत होता, तिथे आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. एकेकाळी “आज बंगाल जो विचार करतो, तो उद्या भारत करेल” असे म्हटले जायचे. परंतु, डाव्या विचारसरणीच्या प्रदीर्घ प्रभावामुळे आणि त्यानंतरच्या टोकाच्या प्रादेशिक अस्मितेमुळे हा प्रांत राष्ट्रीय विकासाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसा तुटलेला वाटत होता.

विकासाची नवी पहाट बंगालची ही ‘वेगळी वाट’ आता पुन्हा एकदा राष्ट्रीय एकात्मतेच्या आणि विकासाच्या महामार्गाला येऊन मिळताना दिसत आहे. जेव्हा बंगाल राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी येतो, तेव्हा केवळ सत्तापरिवर्तन होत नाही, तर संपूर्ण देशाच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक पातळीवर सकारात्मक परिणाम होतो.

बौद्धिक आणि आर्थिक क्षमता बंगालकडे अफाट प्रतिभा आहे. जर या प्रतिभेला आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगस्नेही वातावरण आणि राष्ट्रवादाची जोड मिळाली, तर बंगाल पुन्हा एकदा भारताचे ‘ग्रोथ इंजिन’ बनू शकतो. आजच्या युगात जेव्हा भारत जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करत आहे, तेव्हा बंगालमधील आयटी प्रोफेशनल, शास्त्रज्ञ, कलाकार आणि उद्योजक यांची उणीव देशाला भासत होती. आजच्या निकालाने ही दरी सांधण्याची संधी निर्माण केली आहे. ऐतिहासिक चुकांतून धडा घेत, पूर्व बंगालच्या फाळणीच्या जखमा स्मरणात ठेवून, आता बंगालला ‘सोनार बांगला’च्या दिशेने वाटचाल करावी लागेल. हा विजय म्हणजे केवळ एका पक्षाचा विजय नसून, तो बंगालच्या अस्मितेचा राष्ट्रीय मुख्य प्रवाहाशी झालेला सन्माननीय संगम आहे. बंगालचा हा ‘घरवापसी’चा प्रवास भारताला अधिक समृद्ध, वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ आणि सामर्थ्यवान बनवेल, यात शंका नाही. आता गरज आहे ती द्वेष आणि संघर्षाचे राजकारण सोडून, बंगालच्या त्या गौरवशाली वारशाचे पुनरुज्जीवन करण्याची, ज्याने देशाला ‘वंदे मातरम्’ दिले.

BJSState ElectionTMCबंगाल
Comments (0)
Add Comment