संग्रामबापू भंडारे यांची शाईफेक एक सुचक संकेत.
परकीय इस्लामी आक्रमकांच्या जुलुमी राजवटीत वारकरी संप्रदायाच्या भक्ती मार्गाने हा देश,येथील संस्कृती आणि सामन्य माणसाच्या रक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.देव-देश-धर्माच्या रक्षणार्थ वारकरी संप्रदाय अग्रेसर होता. परंतू महाराष्ट्रात गेल्या एक महिन्या पासून वारकरी संप्रदाया बाबत काही ठराविक राजकीय व्यक्ती निरर्थक चर्चा घडवून वारकरी संप्रदाय जणू काही आपल्या मक्तेदारीचा संप्रदाय असल्याचा आव आणून वारकरी संप्रदायात फूट आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.वास्तविक पाहता वारकरी संप्रदायात घुसखोरी होत आहे असा कांगावा करून त्यांची यादी घोषित करण्याचा अधिकार विकास लवांडे सारख्यांना कोणी दिला? वारकरी संप्रदायातील इतरांना घुसखोर म्हणणारे लवांडे कोण आहेत? वारकरी संप्रदाय कोणाची मक्तेदारी किंवा जहागीर नसून वारकरी संप्रदाय समता व समरसतेचा पुरस्कार करणाऱ्या सामान्य माणसाचा भक्तिमार्ग आहे.त्यामुळे वारकरी बंधू मध्ये फूट व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या फुटीरवादी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी संग्रामबापू भंडारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुढारी असलेल्या विकास लवांडे यांच्या अंगावर फक्त शाईफेक द्वारे निषेध करून सावध इशारा दिलेला आहे.यापूर्वी सुद्धा विकास लवांडे यांनी गडकिल्ले मोहीमवर टीकाटिप्पणी करून धारकरी बंधूंना,हिंदू तरुणांना आतंकवादी करण्याचा प्रकार म्हणत धर्म विरोधी वक्तव्य केलेले आहे.संत तुकोबांनी दांभिक आणि दृष्ट व्यक्तीस त्यांच्या भाषेत कठोर कृती करण्याचा वास्तववादी आपल्या अभंगात”अधमाशी अधम आणि भले तरी देऊ कासेची लंगोटीची”संदेश दिलेला आहे.त्यामुळेच संग्रामबापू यांनी लवांडे प्रवृत्तींना तुकोबांचा फक्त अल्प सूचक संकेत देण्याचा प्रयत्न करून सावध इशारा दिलेला आहे.हिंदू आता जागृत झालेला असून आपल्या प्राणप्रिय धर्मावरील चिखलफेक अमान्य आहे.त्यामुळे लवांडे यांच्यावर झालेली शाईफेक ही फक्त आता सुरुवात म्हणावी लागत असून संग्रामबापू भंडारे यांचे कौतुक करण्यास हरकत नाही.
संग्रामबापू भंडारे यांनी विकास लवांडे यांच्यावर केलेल्या शाईफेक प्रकरणाचा मागोवा घेतल्यास किंवा ही आग कोणी लावली, त्या मध्ये पेट्रोल टाकण्याचे काम कोणी केले याचा विचार केल्यास असे लक्षात येत की, गेल्या तीन चार वर्षांपासून पंढरपूरच्या वारी मध्ये निधर्मी,दांभिक मंडळी, नकली वारकऱ्यांचा वावर वाढला होता.भोळ्या वारकरी बंधू मध्ये फूट व संभ्रम निर्माण करण्यासाठी संविधान वारी ते निधर्मी वारी असे प्रयोग करून वारीत शिरखुर्मा आणि बायबल वाटप करण्यात आले परंतू जागरूक वारकरी बंधूनी दांभिक प्रकारास विरोध करून आळा घातला आहे.दांभिकांचा खरा चेहरा समोर आणला होता.या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यात्मिक आघाडीने पुण्यात दि.२५ सप्टेंबर २०२४ रोजी जयंत पाटील यांच्या नेतृत्वात वारकरी संमेलन घेतल.वारी विषयावर मंथन होऊन शरद पवार यांनी त्याच संमेलन मध्ये वारकरी संप्रदाय मध्ये धर्मांधांचा वावर वाढतोय असे वक्तव्य सुद्धा केले होते.वास्तविक पाहता वारकरी संप्रदायात कोणी धर्मांध नाही आणि कोणत्याही वारकऱ्यांनी “सर तन से जुदा” घोषणा दिल्या नाहीत किंवा कधीच कोणत्याही प्रकारच्या हिंसेला प्रोत्साहन देणारी कट्टरतेची शिकवण कधीच दिलेली नाही “विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेद भेद अमंगळ”हा सहिष्णू आणि उदात्त विचार घेऊन वारकरी संप्रदायाची वाटचाल सुरू असून सतत वर्धिष्णू ठरत आहे वारकरी संप्रदायाचा पाया मुळातच अध्यात्माचा असून रामायण महाभारत जीवनमूल्ये आहेत तसेच “राम कृष्ण हरी”मंत्र आहे.परंतू शरद पवार यांच्या राजकीय क्षेत्रातील प्रवास पाहता त्यांना रामकृष्ण हरी मंत्राचा वावडे असल्याचे लक्षात येते.विकास लवांडे यांनी शरद पवार यांना अपेक्षित असलेली खोटी राजकीय पोपटपंची करण्याचा प्रयत्न केला आहे.पण संग्राम बापू भंडारे यांनी फक्त शाईफेकचा निषेध नोंदवून अल्प दणका दिला असून असा दणका देणे आवश्यक सुद्धा होते.त्यामुळे भविष्यात कोणालाही लवांडे सारखी पोपटपंची करताना दहा वेळा विचार करण्यास प्रवृत करणारी घटना म्हणावी लागेल. शरद पवार यांनी पुण्यातील वारकरी संमेलन मध्ये जे वक्तव्य केले होते त्याच वक्तव्याचा पुनरुच्चार त्यांना दिल्ली मध्ये केला आहे.दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी दिल्ली मध्ये महिला शासकीय अधिकाऱ्यांचे अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले.या संमेलनासाठी प्रकाशित स्मरणिकेत त्यांनी लेखन करुन वारकरी संप्रदाया मध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाल्याचे भाष्य करून वारकरी संप्रदायात ६० टक्के लोक बोलतांना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीने मांडणी करतात.शरद पवार यांच्या ६०टक्के भाष्याचा आधार घेउन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दिनांक, १६ एप्रिल २०२६ रोजी पत्रकार परिषद घेवून आपल्या पूर्व स्वभावानुसार शरद पवारांचे पाय चाटत आपले पुरोगामित्व सिद्ध करण्या साठी गरळ ओकली, त्यात त्यांनी’ वारकरी संप्रदायातील २० तपस्वी व्यक्तीची यादी जाहीर करून त्यांना घुसखोर म्हटले आहे.तसेच टीका करत असताना भाषेची व शब्दांची मर्यादा ओलांडत स्वतःची पात्रता – लायकी’ दाखवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे धर्मचार्या मध्ये उद्रेक होऊन त्याच परिणाम शाईफेक मध्ये झालेला आहे.
संग्रामबापू भंडारे यांच्या “अधमाशी अधम-भले तरी देऊ कासेची लंगोटी,नाठाळाचे माथी हाणू काठी”शाईफेक कृतीमुळे त्यांच्यावर दुटप्पी राजकीय वर्तुळा मधून चौफेर टीका होत असून कठोर कारवाईची मागणी सुद्धा होत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने नियमानुसार योग्य ती करावी त्या बाबत कोणाचेही दुमत नाही.परंतू संग्रामबापू यांच्यावर कारवाईचा शिमगा साजरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुटप्पी राजकीय मंडळी नामदेव जाधव यांच्या वर शाईफेक झाली होती आणि अनंत करमुसे यांना घरात डांबून मारहाण झाली होती. तसेच हिंगोली येथे कीर्तनात केवळ समर्थ रामदास स्वामी यांचा उल्लेख केल्या मुळे कीर्तनकारास मारहाण करण्यात आले होती.तेव्हा कोणत्या बिळात लपली होती किंवा त्यावेळेस त्याची दातखीळ बसली होती का? असा प्रश्न सामान्य माणसात चर्चिला जात आहे. त्याची उत्तरे सुध्दा आता दिली गेली पाहिजेत
महाराष्ट्रातील वारकरी देशात संप्रदाय हा सहिष्णू आणि सर्वसमावेशक असुन सुधारणावादी सामाजिक समरसतेचा पुरस्कार करणारा भक्ती मार्ग आहे.हिंदू धर्मातील असंख्य जाती आणि अनेक पंथ विचार दर्शनांना एकतेच्या सूत्रात बांधून ठेवण्यात वारकरी संप्रदायाची महत्वाची भूमिका सुद्धा आहे.त्यामुळे वारकरी संप्रदायातील इतरांना घुसखोर,धर्मांध म्हणणे किंवा त्यांची यादी घोषित करणे कितपत योग्य आहे.याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.शेवटी वारकरी संप्रदायातील इतरांना घुसखोर किंवा धर्मांध म्हणणाऱ्या विकास लवांडे सारख्या प्रवृत्तीचा निषेध असुन संग्रामबापू भंडारे यांनी शाईफेक करून अशा प्रवृत्तीना एक सावध इशारा आहे किंवा वेळीच सुधरा असा सूचक संकेत दिला असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणारं नाही.
तुकोबा म्हणतात होईल तैसें बळ ।फजीत करावे ते खळ।।
तुका म्हणे त्याचें ।पाप नाहीं ताडणाचें ॥
अशोक राणे.
लेखक मुक्त पत्रकार तथा संत साहित्याचे अभ्यासक आहेत.